Friday, 30 August 2013

तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !
तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ
नाही !
कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!
न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!
तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!
किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!

Monday, 26 August 2013

१) रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
२) रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!
३) रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
४) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
५) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
६) गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
७) खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
८) फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!
९) जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.
१०) रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.
११) जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.
१२) खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.
१३) एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.
१४) आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.
१५) ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
१६) ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!
१७) हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
१८) स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.
१९) भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
२०) रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!
२१) प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या ना!
२२) दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?
२३) क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…
२४) दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!
२५) तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
२६) तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.
२७) काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.
२८) तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.
२९) हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर! मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय जो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलेला आहे! बी हॅप्पी!!!!!

Friday, 23 August 2013

शोना माझे हे पत्र आज तुला काही सांगणार आहे
जे तू कधी ऐकले नाहीस
ते तुझ्या डोळ्यां समोर उघडणार आहे

कधी तरी कळेल तुला
तू तेव्हा तरसशील
खोटे म्हणणाऱ्या ह्या प्रेमाला तू खरच तेव्हा ओळखशील

प्रेम खरच असता रे तुला आज नाही समजलं
गर्दीत हरवला आहेस तू
अन त्यात तू मला हि गमावलंस

म्हणायचास न तूच मी प्रेम मनात नाही
पण वेळ येईल तुला तेव्हा मीच कुठे सापडणार नाही

रडशील तेव्हा तू मला आठवण करून
पण तेव्हा मला हि तुझ्या डोळ्यांत प्रेम पाहता येणार नाही

मला खरंच तू हवा होतास रे
जाणून का घेतलं नाहीस
ओल्या माझ्या हृदयाला मिठीत का सुखावलं नाहीस

आता खूप वेळ झाली शोना
मी दूर निघून आली
माझे अस्तित्वच मी तुझ्या जवळ विसरून आली

माझे हे पत्रर वाचून शोना डोळे भरू देऊ नकोस
प्रेम केलंय रे तुझ्यावर मी
तुझ्याच सोबत असणार जेव्हा मला आठवशील
तुला बंद डोळ्यांनीहि मी समोर सापडणार ...

मला खरंच तू हवा होतास रे .....
फक्त तू हवा होतास .....
का रडतेस..??
का रडतेस आता आणि कशासाठी..??

तेव्हा तर हसत हसत,
मला दूर केले..
मग आता रडून दाखवून,
तू काय सिध्द केले..??

जेव्हा मला खरी गरज होती..
तेव्हा मला तर एकट्यालाचं सोडले..
मात्र तुझ्या सोबतीला कोणीतरी होते..
म्हणून तू मागे वळून नाही पाहिले..

आता मला सवय लागली आहे..
तुझ्याशिवाय जगण्याची..
मग तू का आस लावली आहेस..
माझी परत होण्याची..??

नको रडून मजबूर करूस..
मला परत येण्यासाठी..
कारण..!!
आता मी पुन्हा येणार नाही ते दुःख सोसण्यासाठी..

आता मी पुन्हा येणार नाही ते दुःख सोसण्यासाठी..

Wednesday, 21 August 2013

तू नाही दिलास reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास phone
मला यातना होणार नाहीत कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू विसरलास मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे कि तुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस  मला
तरी मी वाट पाहणार अखेरच्या श्वासापर्यंत फक्त
तुझाच  अन तुझाच  राहणार कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे...........!

Tuesday, 20 August 2013

पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
तू गेल्यावर...
शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात....!!
तू गेल्यावर....
मजा मी एकटा गप्प बसून राहतो
तू येणार्या क्षणांची आतूरतेने वाट पाहतो....!!
तू गेल्यावर....
आजही आठवते मला तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर चांदण्याना वाटते जशी अमावस.....!!
तू गेल्यावर....
आता फक्त मी शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन कविता करत राहतो....!!
तू गेल्यावर.....
आता मज मला राहत नाही स्मरण
इतका अभागी तुझ्याशिवाय मी वाट पाहता तुझी येतही नाही मरण....!
किती दिवस Gf मुळे जरा अस्वस्थ होतो...काळजी वाटत होती.
पण कळलं कि तिचा नविन Bf आहे आता.....थोड दुःख वाटलं...
पण समाधानही वाटलं की लवकर मोकळा झालो...आता जबाबदारीतुन मोकळा झालोय....
त्यामुळे प्रेमाचा खेळ आता बसझाला.....कितीपण मनापासुन प्रेम केलं
तरी कुठेतरी ते कमीच पडतं......असो....शेवटी नशिब...Gf ने दगा केला 
म्हणुन आत्महत्या करणे,दारु पिणे यातला मुलगा मी नाही....जगायचं आहे ते आईवडीलांसाठी...
त्यांचे उपकार कधीच फेडु शकतनाही...तशी त्या उपकारांची किंमत
कशातही मापु शकत नाहि...सगळं करा पण आईवडिलांना कधी दुखवु नका......
प्रेमासाठी आयुष्य पडलंय...प्रेम हे आयुष्य नाहि.....सगळं मनापासुन खरं बोलतोय...हवं तर
पकाव समजा...
पण भावनेच्या भरात जाऊन कोणताहि निणँय घेऊ नका...भविष्यात
जी व्यक्ती तुमची जोडीदार बनेल (नवरा/बायको) तीला मनापासुन स्विकारा..
जे प्रेम तुमच्या Gf/bf ला कमी पडलं तेच प्रेम त्या व्यक्तीवर करुन तीला कधी स्वतःपासुन दुर करु नका...
आयुष्यात उतार चढाव येतातच...रागाच्या भरात काहि करण्यापेक्षा शांत
डोक्याने आलेल्या परिस्तिथिला तोंड द्यायला शिका.....मीपणा अहंकार सोडुन
नम्रपणे जीवन जगायला शिका....स्वतःची चुक मान्य करुन दुसरयाला माफ करायला शिका 
उद्याचा दिवस तुमचाच असेल..........

Saturday, 17 August 2013

तू बरोबर असतेस तेव्हा,खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,

नाहीतर मनात सगळं दुखं,दाबून ठेवावस वाटत...


तू बरोबर असतेस तेव्हा,तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,

नाहीतर खिडकीतूनच,पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...


तू बरोबर असतेस तेव्हा,फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,

नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!

Wednesday, 7 August 2013

जगाचं जेवढं.....आयुष्यमान असेल....
असं प्रेम कधीच...जगानं पाहिलं नसेल....
इतकं कुणी कुणाला....वेड लावलं नसेल....
इतकं अलगद काळीज.....कुणी चोरलं नसेल....
नुसत्या गोड हसण्यानं.....इतकं कुणी फसवलं नसेल....
खंर प्रेम कळत असूनही...इतकं कुणी रडवलं नसेल....

खोट्या नजरेने प्रेम जडवलस,,,,,आणि आयुष्यभरासाठी रडवलस....

Tuesday, 6 August 2013

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!
१)आपला पहिला पगार आपल्या आई
वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात
पाणी आणून
करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून
हसणे...!!!
4)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत
मारणे...!! !
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम
करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात
घेवूनचालणे...!! !!
६)जे आपली मनापासून काळजी करतात
त्यांच्या कडून
एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या क
चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण
जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत
घेते आणि आपल्याला अश्रू आवरत
नाही....!!
विसरून जा असे कसे म्हणू,
आठवणीत तर तुझेचं अश्रू वाहतात..
परत ये असे कसे म्हणू,
तुला आपलेसे केले नाही ह्याची खंत
बाळगतात..
तू तुझे अस्तित्व सारे मनाचा कुपीत
लपवलं आहे,
अखेरचा क्षणीही माझ्या शिवाय
सारे तुला शोधतायत..
आज खोल गेलेल्या डोळ्यात तुझे फुल
पडले,
तेव्हा कळले तुझ्या शेजारीचं माझे
शरीर गाडले..
आता शांत निवांत पडलो आहे,
तू येण्याची वाट पाहत आहे..

Collection